नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेची संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये पीएम धन धान्य कृषी योजना काय आहे, यासाठी मंजुरी कधी देण्यात आली, कोणत्या शेतकऱ्याला या अंतर्गत लाभ घेता येणार आहे, लाभार्थी कोण असणार आहेत, त्याचप्रमाणे ही योजना किती वर्ष चालणार आहे, किती निधी मंजूर आहे, याचे फायदे कोणकोणते आहेत, जिल्ह्यांचा निवडीचा निकष काय आहे, योजना कशी अमलात आणली जाणार आहे या संबंधित संपूर्ण माहिती या लेखांमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नीट वाचा.
प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना काय आहे?
प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना ही एक राष्ट्रीय स्तरावर राबवली जाणारी कृषी विकास योजना आहे. ह्या योजनेचा मुख्य उद्देश कमी उत्पादकता असलेल्या जिल्ह्यांमध्ये शेतीचे उत्पादन वाढवणे, शेतकऱ्यांना आधुनिक शेतकी तंत्रज्ञानावर आधारित सुविधा मिळवून देणे आणि त्यांचे उत्पन्न वाढवणे आहे. या योजनेत विशेषत: शेतकऱ्यांना फसल विविधीकरण, सिंचनाची सुधारणा, पीक साठवणूक सुविधा आणि सुलभ कर्ज मिळवण्याची प्रक्रिया मजबूत केली जाईल.
PM Dhan Dhanya Krushi Yojana मंजुरीची तारीख
ही योजना १ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ ने ह्या योजनेला मंजुरी दिली आणि ती लागू करण्यासाठी आवश्यक खाजगी आणि सरकारी विभागांचा समन्वय ठेवण्याची प्रक्रिया सुरू केली.
लाभ कोणत्याही शेतकऱ्याला होणार आहे?
ही योजना कमी पीक उत्पादकता असलेल्या १०० जिल्ह्यांना लक्ष करत आहे. यामध्ये महाराष्ट्रासारख्या राज्यांतील मागासलेले, कमी उत्पादन असलेले आणि कमी सिंचन असलेले जिल्हे समाविष्ट आहेत. योजनेचा मुख्य लाभ असा आहे की:
- कमी उत्पादकता असलेल्या शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतींचा उपयोग करून अधिक उत्पन्न मिळवता येईल.
- शेतकऱ्यांना सुलभ कर्ज मिळवण्याचा लाभ होईल.
- पंचायत आणि ब्लॉक स्तरावर साठवणूक क्षमता वाढवली जाईल, ज्यामुळे उत्पादनाचे नुकसान होणार नाही.
- सिंचन आणि पीक विविधीकरणाच्या सुविधा सुधारण्यात येतील.
Jan Dhan Yojana in Marathi: प्रधानमंत्री जन धन योजना 2025 बँक खाते
PM Dhan Dhanya Krushi Yojana लाभार्थी:
- लहान शेतकरी, सीमांत शेतकरी, व भूमिहीन कुटुंबे ज्यांना शेतकामे करता येतात परंतु यांना आवश्यक त्या संसाधनांची आणि कर्जाची कमतरता आहे.
- विशेषतः ग्रामिण महिलांसाठी, तरुण शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण तरुणांसाठी उद्योजकता आणि कौशल्य विकासाची मोठी संधी उपलब्ध होईल.
PM Dhan Dhanya Krushi Yojana किती वर्षे चालणार?
ही योजना ६ वर्षे (२०२५ ते २०३१) लागू राहील. या कालावधीत सरकार विविध जिल्ह्यांमध्ये कृषि उत्पादन वाढवण्यासाठी विविध उपाययोजना राबवेल.
किती निधी मंजूर केला आहे?
प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेसाठी प्रत्येक वर्षी ₹२४,००० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आले आहेत. या निधीचा वापर:
शेतकऱ्यांना सिंचन सुविधा सुधारण्यासाठी,
- फसल विविधीकरणासाठी,
- पीक साठवणूकीसाठी,
- कर्ज सुविधेसाठी,
- आणि आवश्यक तांत्रिक मदतीसाठी केला जाईल.
संपूर्ण ६ वर्षांसाठी एकूण निधी: ₹१,४४,००० कोटी
PM PRANAM YOJANA शेतकऱ्यांसाठी 3.70 लाख करोडची योजना माहिती
PM Dhan Dhanya Krushi Yojana चे मुख्य फायदे:
कृषी उत्पादकतेत वाढ – कमी पीक उत्पादकता असलेल्या १०० जिल्ह्यांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल.
सिंचन सुविधांची सुधारणा – नवीन सिंचन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केली जाईल, ज्यामुळे पाणी टंचाई कमी होईल.
पिके विविधीकरण – शेतकऱ्यांना अधिक विविध प्रकारांची पिके घेण्यास प्रोत्साहित केले जाईल. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.
किफायतशीर किमतीने कर्ज – शेतकऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध होईल ज्यामुळे त्यांना नवीन तंत्रज्ञान व संसाधनांमध्ये गुंतवणूक करता येईल.
साठवणूक प्रणालीचा विकास – पंचायत आणि ब्लॉक पातळीवर साठवणूक सुविधा विकसित केली जाईल, त्यामुळे फसलाचा योग्य बाजारभाव मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होईल.
कौशल्य विकास आणि रोजगार – ग्रामीण युवांसाठी, शेतकऱ्यांसाठी कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबवले जातील ज्यामुळे नवे रोजगार निर्माण होतील.
शेतीतील बेरोजगारीला कमी करण्यासाठी उपाय:
केंद्र सरकारने विशेषत: कौशल्य विकास, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान च्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास करण्यासाठी ‘ग्रामीण समृद्धी आणि लवचिक विकास कार्यक्रम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत उद्योजकता विकास, नोकरी निर्माण आणि शेती संबंधित कार्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल.
प्रधानमंत्री किसान मानधन योजना 2025: Shetkari Pension Yojana 2025
जिल्ह्यांचा निवडीचा निकष
योजनेमध्ये सहभागी होणारे जिल्हे खालील तीन निकषांवर आधारित निवडले जातील:
- कमी पीक उत्पादकता
- कमी फसली तीव्रता
- कमी कर्ज वितरण
या जिल्ह्यांचा सखोल अभ्यास करून त्यांचा विकास करण्यात येईल.
योजना कशी अंमलात आणली जाईल?
- या योजनेचे अंमलबजावणी केंद्र सरकारच्या ११ विभागांच्या समन्वयाने आणि राज्य सरकारांच्या भागीदारीत केली जाईल.
- प्रत्येक जिल्ह्यात विशेष समिती तयार केली जाईल, ज्यात शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग असेल.
- योजना राबवण्यासाठी डॅशबोर्ड आधारित मॉनिटरिंग सिस्टम तयार केली जाईल, ज्यामुळे प्रगतीवर लक्ष ठेवले जाईल.
प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना हे भारतीय शेती क्षेत्रासाठी एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे. यामुळे कमी उत्पादकतेच्या जिल्ह्यांमध्ये कृषी उत्पादन वाढवता येईल, शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल, आणि ग्रामीण भारतात रोजगाराची संधी निर्माण होईल. या योजनेचा उद्देश केवळ कृषी क्षेत्राचा विकास नाही, तर समाजातील प्रत्येक शेतकऱ्याला पायावर उभे राहण्याची संधी देणे आहे.
- Panjabrao Dakh कोण आहेत? त्यांचा हवामान अंदाज कसा काय खरा ठरतो?
- Maharashtra Budget 2025: महाराष्ट्र अर्थसंकल्पातील सर्व महत्वपूर्ण योजना माहिती
- Gopal Credit Card Registration 2025: ऐसे भरें फॉर्म और पाएं 1 लाख रुपये
- वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2025 माहिती: Rashtriya Anna Suraksha Yojana
- Jan Dhan Yojana in Marathi: प्रधानमंत्री जन धन योजना 2025 बँक खाते