Pik Vima Yojana Maharashtra: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२२ आणि रब्बी हंगाम २०२०-२१ पासून ३ वर्षाकरिता घेण्यात आलेल्या शासन निर्णयाची माहिती पाहणार आहोत. पाहुयात काय आहे हा प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप आणि रब्बी हंगामाकरिता घेण्यात आलेला ५ मे २०२२ रोजी च्या महाराष्ट्र शासन निर्णय GR.
पीक विमा GR ५ मे २०२२
पिक विमा म्हणून अनुदानाची रक्कम मागील अनुदानाची रक्कम ५ मे २०२२ रोजी विमा कंपन्यांना महाराष्ट्र सरकार द्वारे वितरित करण्यात आलेली आहे. भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी, कृषी आयुक्तालय याची शिफारस तसेच केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शन सूचना मधील बाबींचा विचार करून प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२१-२२ याअंतर्गत राज्य हिस्सा पिक विमा हप्ता अनुदानाच्या प्रथम हप्त्यापोटी ११७ कोटी २६ लाख ३३ हजार ५५२ इतके अनुदान विमा कंपन्यांना वितरित करण्यास शासनाने ५ मे २०२२ रोजी मान्यता दिलेली आहे. सदरची अनुदान वितरित रक्कम रब्बी हंगाम २०२१-२२ करिता वितरित करण्यात येणार असून, त्याचा वापर यापूर्वी इतर हंगामाकरिता अनुज्ञेय असणार नाही याची नोंद घ्यावी.
- १० कोटी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम शिष्यवृत्ती योजनेसाठी निधी वितरित
- online application 2023 मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र माहिती
- PMMVY 2023 प्रधानमंत्री मातृ वंदना योजना काय आहे?
- १३ कोटी ७३ लाख प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना शासन निर्णय
- अर्ज सुरु खरीप पीक विमा अनुदान योजना 2023 संपूर्ण माहिती